केवळ मराठी इंडस्ट्री नाही तर टॉलीवूड,बॉलीवूड आणि भोजपूरीतही आपल्या अभिनयानं आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे सिंघम फेम अशोक समर्थ तब्बल ८ ते ९ वर्षांच्या ब्रेकनंतर पुन्हा मराठी मालिकांकडे वळले आहेत. तू तेव्हा तशी मालिकेत सध्या ते खलनायकी पात्र आकाश जोशी रंगवताना दिसत आहेत. सकाळ पॉडकास्ट मुलाखतीत अशोक समर्थ यांनी मराठी इंडस्ट्रीविषयीची मनात असलेली खंत बोलून दाखवली आहे. त्याचवेळी त्यांनी आपलं बारामती कनेक्शन सांगताना अजित दादा पवार आणि शरदजी पवार यांच्याविषयीच्या काही आठवणी देखील शेअर केल्या आहेत.